“या विभागात नुकसानग्रस्तांना १ हजार ५७ कोटींचे वाटप”
औरंगाबाद : अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यात मदतनिधीचा दुसऱ्या हप्ता वाटप करण्यात आला आहे. त्यानुसार २९ जानेवारी अखेरपर्यंत १०५७ कोटी ७८ लाख ९ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.
औरंगाबाद : अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यात मदतनिधीचा दुसऱ्या हप्ता वाटप करण्यात आला आहे. त्यानुसार २९ जानेवारी अखेरपर्यंत १०५७ कोटी ७८ लाख ९ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.
मराठवाड्यात जून-ऑक्टोबर २०२० दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे २४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राला मोठा फटका बसला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील निधीवाटपानंतर दुसऱ्या टप्प्यात १३०३ कोटी ४९ हजार रुपयांचा निधी मिळाला. त्यापैकी २६ लाख ७१ हजार ८९ शेतकऱ्यांना १०५७ कोटी ७८ लाख ९ हजार रुपये वाटप झाले;आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात १४१ कोटी ९२ लाखांपैकी ३८ हजार ७०२ शेतकऱ्यांना ८५ कोटी ७८ लाख ४९ हजार रुपये, जालना जिल्ह्यात २६१ कोटी १३ लाखांपैकी ४ लाख ५ हजार ७४१ शेतकऱ्यांना २०५ कोटी ४३ लाख, परभणी जिल्ह्यात ९० कोटी २० लाख ८६ हजारांपैकी १ लाख ५१ हजार ५९० शेतकऱ्यांना ६३ कोटी ३० लाख ७७ हजार रुपये, हिंगोली जिल्ह्यात ११४ कोटी ९८ लाखांपैकी २ लाख ८३ हजार ८९२ शेतकऱ्यांना ११२ कोटी ५४ लाख १६ हजार, नांदेड जिल्ह्यात २८२ कोटी ५६ लाख ६६ हजारांपैकी ७ लाख १६ हजार ७३६ शेतकऱ्यांना २६४ कोटी ३३ लाख ९५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. “या विभागात “या विभागात
हे पण वाचा
- ‘नानाजी देशमुख कृषी: पोखरा योजनेतील गावांची यादी आली यादी अशी पहा घरबसल्या’
-
शिवजयंती पर्यंत दहा हजार शेतकऱ्यांना मिळतील सौर कृषी पंप – ऊर्जा मंत्री
उस्मानाबादमध्ये ११२ कोटी ६२ लाख रुपयांचे वाटप
लातूर जिल्ह्यात प्राप्त १२५ कोटी १५ लाख ४४ हजारांपैकी १०३ कोटी ४७ लाख ४ हजार रुपये १ लाख ७१ हजार ६५७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यात १३३ कोटी ६५ लाख ७३ हजारांपैकी ३ लाख २४ हजार ७५५ शेतकऱ्यांना ११२ कोटी ६२ लाख ४३ हजार रुपये वाटप करण्यात आले.
संदर्भ:- ऍग्रोवन
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या