25-05-2023
डाळिंबची सर्वात जास्त लागवड हि अहमदनगर, सांगली, वाशिमपुणे, सोलापूर या जिल्हयात प्रामुख्याने होत असून महाराष्ट्रातील इतर जिल्हयातही मोठया प्रमाणावर डाळिंबाची लागवड होते, महाराष्ट्रामध्ये डाळिंब पिकाखाली 70000 ते 75000 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी सुमारे 30000 ते 40000 हेक्टर क्षेत्र उत्पादनाखाली आहे.
डाळिंबाची लागवड हि कोणत्याही जमिनीत घेण्यात येते. अति हलक्या जमिनीपासून भारी किंवा मध्यम काळी व सुपीक जमिन डाळींबाच्या लागवडीसाठी चांगली असते या जमिनीत झाडांची वाढ चांगली होते, हलक्या प्रतीची, खडकाळ मुरमाड डोंगर उताराच्या जमिनी सुध्दा चालतात. मात्र जमिनीत पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे.
डाळींबाच्या झाडांसाठी थंड व कोरडे हवामान मानवते, तसेस झाडांना फुले लागल्यापासून फळे होईपर्यंतच्या काळात भरपूर उन व कोरडे हवामान असल्यास चांगल्या प्रकारची फळे तयार होतात आणि त्याची वाढ चांगली होते.
मृदुला, मस्कत, जी १३७, फुले आरक्ता, भगवा, गणेश
डाळिंबाच्या लागवडीसाठी जमिनीत 5 × 5 मिटर अंतरावर खड्डे करून डाळिंबाची लागवड करावी. खंडाची खोली आणि रुंदी हि त्यासाठी 50 × 50 × 50 सेमी आकाराचे असावी
१ ते ४ वर्षापर्यंत डाळींबाच्या प्रति झाडासाठी खालील प्रमाणे रासायनीक खते द्यावीत
पालाश दरवर्षी द्यावे
डाळिंबाच्या झाडाला फुले येण्यास सुरुवात झााल्यानंतर फळे उतरुन घेईपर्यंतच्या काळात नियमित व पुरेसे पाणी द्यावे. पाणी कमी देण्यात आल्यावर फुलांची गळ होते आणि झाडांची वाढ कमी होते. पावसाळयात पाऊस न पडल्यास आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावे व पुढे फळे निघेपर्यंत 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. फळाची तोडणी संपल्यानंतर बागांचे पाणी तोडावे.
आंबिया बहार हा जानेवारी फेब्रूवारी येतो तर त्याचे फळ जून ते ऑगस्ट मध्ये येते
मृग बहार हा जून ते जूलै येतो तर त्याचे फळ नोव्हेबर ते जानेवारी मध्ये येते
हस्तबहार हा सप्टेबर आक्टोबर येतो तर त्याचे फळ फेब्रूवारी ते एप्रिल मध्ये येते
डाळिंबावर मर रोग पडत असतो या रोगामुळे डाळींबाचे झाड निस्तेज आणि सुकलेले दिसते. सुरवातीला झाडांची पाने पिवळी पडतात आणि फळांची गळती सुरु होते आणि काही दिवसांनी काही फांदया पूर्णपणे वाळतात आणि नंतर काही दिवसांनी संपूर्ण झाड वाळते
source : shetkarimi