जगाचा पोशिंदा सन्मानाने जगला पाहिजे
जगाचा पाठीवर सर्वात जास्त मेहनत करून जास्तीत जास्त लोकांचे पोट भरणारा एकमेव घटक म्हणजे शेतकरी. भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आधार कसे देता येईल याचे काम मागच्या जवळपास 15 वर्षांपासून फार्मर्स नीड अग्रोटेक ही कंपनी निरंतर प्रयत्न करत आहे.
जाणून घ्या सिटी कंपोस्ट चे फायदे
1.याखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये पिकास भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
2.याखतामध्ये साधारणपणे 1 ते 2.0 टक्के नत्र, 0.05 ते 0.82 स्फुरद व 0.65 ते 1.25 टक्के पालाश
असल्याने पिकास ते फारदेशीर ठरते.
3.हेखत वापरामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात. जमिनीचा पोत सुधारतो.
जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
4.जमिनीचा सामू (पीएच) योग्य प्रमाणात राखला जातो.
5.मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ
चांगली होते.
6.मुळ्या अथवा झाडांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते, त्यामुळे जमिनीत हवा खेळती
राहून मुळांची वाढ चांगली होते.
7.पाण्याचे बाष्पिभवन फारच कमी होते.
8.जमिनीची धूप कमी होते.
9.जमिनीतील उपरुक्त जीवाणूंच्या संख्येत भरमसाट वाढ होऊन वर खते आणि पाण्याच्या खर्चात बचत
होते.
10.पिकास समतोल, सकस व संतुलित आहार मिळतो. त्यामुळे पिकाची कीड व रोग प्रतिकारक शक्ती
वाढते.
अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तयार केलेले खत ....शेतकऱ्यांना परवडणारे दरात उपलब्ध..4000 हजार रुपये प्रति टन....