पिकाच्या वाढीसाठी १७ अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.
१. नैसर्गिक अन्नद्रव्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन
२. मुख्य अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद, पालाश पिकाची गरज ५०० मिलीग्रॅम/किलो
३. दुय्यम अन्नद्रव्ये - कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक
४. सूक्ष्म अन्नद्रव्ये - लोह, मँगनीज, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम, बोरॉन, निकेल पिकाची गरज -मिलीग्रॅम / किलो< 900
ही सर्व १७ अन्नद्रव्ये अरनॉन व स्टाऊट या शास्त्रज्ञांनी पिकाला असलेली मूलद्रव्यांची आवश्यकता सिद्ध करण्यासाठी निश्चित केलेले खालील तीन महत्त्वाचे निकष पाळतात.
• एखादे अन्नद्रव्य विशिष्ट प्रमाणात मिळाल्याशिवाय पीक जीवनचक्र पूर्ण करू शकत नाही.
पिकामध्ये घडणाऱ्या चयापचय व जैवरासायनिक क्रियांमध्ये प्रत्येक अन्नद्रव्याला विशिष्ट कार्य असते.
एखादे अन्नद्रव्य कमी पडल्यास त्याची भरपाई व त्याचे कार्य दुसरे अन्नद्रव्य करू शकत नाही.
पिकाच्या वापरासाठी फक्त सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता असणे पुरेसे नसून त्यांचे परस्पर प्रमाण योग्य असणेही तितकेच आवश्यक असते.
सर्व अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात दिल्यास पिकाचे चांगल्या प्रतीचे वाढीव उत्पादन मिळते. हे आता संशोधनांती सिद्ध झाले आहे. एखादी वनस्पती जमिनीतून अन्नद्रव्ये शोषून घेताना मातीमध्ये असलेल्या अन्नद्रव्यांच्या उपलब्ध साठ्याच्या आधारे ते अन्नद्रव्य शोषून घ्यायचे किंवा नाही तसेच किती प्रमाणात हे ठरवत असते.. प्रत्येक वनस्पतीसाठी सर्व अत्यावश्यक अन्नद्रव्यांची विशिष्ट प्रमाणात गरज असते. पिकाला मुख्य व दुय्यम अन्नद्रव्यांचा पुरवठा आवश्यक त्या प्रमाणात केलेला असल्यास व त्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांची जोड दिल्यास पिकाचे जास्त उत्पादन व चांगला दर्जा मिळू शकतो
अन्नद्रव्यांच्या वाढत्या शोषणानुसार पिकाचे उत्पादन व रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ होते.
पिकाचे सर्वाधिक उत्पादन मिळते
अधिक माहितीसाठी संपर्क : 8830929482