गांडूळांच्या मदतीने सेंद्रिय पदार्थ कुजवून गांडूळ खताची निर्मीती होते. गांडूळखतामध्ये पाण्यामध्ये सहजपणे विद्राव्य अशी मुख्य तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये असतात.गांडूळ खत हे एक अन्नद्रव्यांनी समृध्द असे सेंद्रिय खत व भूसूधारक असून सेंद्रिय शेती मध्ये याचा वापर अन्नद्रव्यांचा उत्तम स्रोत म्हणून केला जातो. यामुळे जमीनीची जडणघडण, भुसभुसशीतपणा, जलधारणाशक्ती वाढून मातीची धूप कमी होते. यामुळे जमीनीमध्ये गांडूळांची संख्या तसेच कार्यक्षमता वाढीस लागते.
यामध्ये सर्वसाधारणतः सेंद्रिय कर्ब १८ - २० %, नत्र १.० - १.५ %, स्फुरद ०.८ १.०% व पालाश ०.८ १.० % असतो.
फायदेः
वापरण्याचे प्रमाणः एकरी ५०० ते १००० किलो शक्यतो लागवडीच्या वेळी जमीनीतून द्यावे. या शिवाय रासायनिक खत देताना १:१ या प्रमाणात मिसळून द्यावे.
उपलब्धताः 50 किलो बॅग
पत्ता:- प्रीमियम भाजी पाला मार्केट, गरवारे फाटा जवळ, आडगाव, नाशिक