वसुंधरा उच्च क्वालिटी (गांडूळ खत)
गांडूळ खत १ किलो, ५ किलो, १० किलो, २५ किलो, ५० किलो पॅकींगमध्ये उपलब्ध...!
उच्च प्रतिचे गांडूळे मिळतील
गांडूळ खताची गरज आजपर्यंत शेतकऱ्यांना योग्य, तंत्रशुध्द पध्दतीचे मार्गदर्शन न मिळाल्यामुळे तसेच अधिक उत्पदानाच्या मोहाने रसायनिक खतांचा असंतुलित वारेमाप वापर केल्यामुळे जमिनीची क्षारपड होऊन जमिनीचा कस कमी होऊन ती हळूहळू नापीक होऊ लागली आहे.
जमिनीतील ह्युमस हा पदार्थ योग्य प्रमाणात असेल तरच जमिनीतील सर्व घटक वाढीच्या दृष्टिने उपयुक्त परिस्थितीत राहतात. त्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहून पिकांच्या मुळांना हवा, पाणी व अन्न घटक योग्य प्रमाणात मिळतात. यावरील संशोधित उपाय म्हणून वसुंधरा नॅचरल ने वसुंधरा हे वनस्पतीजन्य जैविक गांडूळ खत विकसीत केले आहे.
गांडूळ खत वापरण्याचे प्रमाण गांडूळ खताचा थोडक्यात परिचय
- आंबा : १० वर्षाखाली प्रति झाडास १० किलो १० वर्षापुढील प्रति झाडास १५ किलो
- द्राक्ष : १५०० किलो एप्रिल छाटणी १००० किलो ऑक्टोंबर छाटणी
- डाळिंब : २ ते ३ कि. रोप लावण्यावेळी प्रति रोपास ३ ते ४ किलो प्रत्येक सहा महिन्यानंतर प्रति रोपास
- कांदा : ५०० किलो मशागतीच्या वेळी
- ऊस : १२०० किलो लागवडीच्या वेळी
- भाजीपाला : १००० किलो लागवडीच्या वेळी
- गांडूळ खत वापरामुळे जमिनीची धूप कमी होऊन जिवाणूंच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
- गांडूळ खतामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत तर होतेच त्याचबरोबर जलधारणा शक्ति वाढते.
- गांडूळ खताचा विघटन प्रक्रियेत तयार होणाऱ्या अम्लामुळे जमिनीचा सामू (पी.एच) योग्य प्रमणात राहण्यास मदत होते.
- गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तीला उत्तम प्रतिची बनवितात.
- गांडूळखतामध्ये ह्युमस चे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फूरद, पालाश व इतर सुक्ष्म अन्नद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
- गांडूळ खतामुळे मातीतील सुक्ष्म जीव टिकून राहतात.
- ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन देखील करता येते.
वसुंधरा नॅचरल व्हर्मी कंपोस्ट दत्त चौक, नविन सिडको, नाशिक