मानवचलीत कांदा,कोथिंबीर,मेथी पेरणी यंत्र

मानवचलीत कांदा,कोथिंबीर,मेथी पेरणी यंत्र
रणजित निंबाळकर 
 
 
 
 मेसेज करा
 कॉल करा

मानवचलीत कांदा,कोथिंबीर,मेथी पेरणी यंत्र

शेती मध्ये आज अनेक अनेक नवनवीन बदल होत आहेत. अनेक औजारे ह्या मनुष्यबळाच्या अभावी गरज बनली आहेत. तसेच यामुळे कमी वेळात अचूक व परिणामकारक अनेक वस्तू शेतीसाठी आवश्यक गरज बनल्या आहेत.  यापैकी एक गरज म्हणजे  म्हणजे पेरणी करणे , आज अनेक जणांना पशुधन परवडत नाही व छोट्या शेतकऱ्याला इतर पर्याय खर्चिक झाले आहेत. तसेच आपल्या वेळेत उपलब्ध होत नाहीत.

तसेच अनेक प्रकारच्या लागवडी ह्या खर्चिक व वेळेत मनुष्य बळ न मिळाल्यास नुकसान सहन करावे लागते यासाठी आम्ही घेऊन आलोय 

मानवचलीत पेरणी यंत्र , एक यंत्र जे की अनेक गरजा पूर्ण करते

याचे प्रमुख फायदे खालील प्रमाणे 

  1. कमीत कमी बियाणे व अचूक अंतरावर पेरणी.
  2. कांदा , भाजीपाला या तत्सम पिकांना रोपे तयार करण्याची गरज नाही ( यामुळे पैसे , श्रम , वेळ , मनुष्यबळ ) याची मोठ्या प्रमाणात बचत होते .
  3. पिकाचा पुनर्लागवड व काढणी काळ १ महिन्यापर्यंत कमी होतो. पुनर्लागवड करतांना मुळयांना झालेल्या जखमांमुळे होणारे बुरशीजन्य रोगांपासुन बचाव होतो. पर्यायाने कमी निविष्ठा लागतात.
  4. दोन रोपांतील अंतर 2 इंचापासून 12 इंचापर्यंत ठेवता येते त्यामुळे कांदा , गाजर , मेथी , कोबी , मुळा यासारख्या पिकांची योग्य अंतरावर पेरणी केल्याने एकसारखा आकार व प्रति एकरी घनता उच्चतम मिळते . पर्यायाने एकसारखा आकार मिळतो  ( अंतर कमी जास्त करण्यासाठी वेगवेगळ्या चकत्या सोबत दिल्या आहेत
  5. हे यंत्र 5 व 7 फनामध्ये उपलब्ध आहे एकूण अंतर 42 इंच म्हणजे साडेतीन फूट आहे.
  6. दोन ओळीतील अंतर पाहिजे तेवढे ठेवता येते
  7. हस्तचलीत असल्याने इतर खर्च नाही , पूर्ण यंत्र उच्च प्रतीच्या लोखंड व प्लास्टिक पासून तयार केले आहे त्यामुळे दीर्घकालीन वापर करता येतो
  8. वजन अतिशय कमी असल्याने वापर करण्यास सुटसुटीत आहे.
  9. आंतर पिके , सापळा पिके यांची स्वतंत्र ओळ मुख्य पिकसोबत पेरता येते त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी  अतिशय उपयुक्त
  10. पर्यायाने वेळ , पैसे , श्रम वाचून अतिशय गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते . सर्व प्रकारची भाजीपाला बियाणे , कांदा, धने (कोथिंबीर) , तीळ , काऱ्हाळ , मुळा , कोबी, गाजर , बीट, धने , मेथी , मिरची, भेंडी, गवार, टोमॅटो यासारखी व इतर अनेक  बियाणे यशस्वी रित्या पेरता येतात.
  11. या यंत्राने सर्व लहान बिया कांदा,धने, पालक,बीट,मुळा, गाजर, शेपू, मूग, उडीद, मेथी, टोमॅटो, भेंडी, गवार, कोबी, फ्लाँवर,जिरे इ सर्व बिया टोकल्या जातात.

पर्यायाने अनेक महागडी बियाणे कमी लागतात व खर्चात व वेळेत मोठी बचत होते

आपली मागणी किंवा डेमो बघण्यासाठी खालील पत्यावर सम्पर्क साधावा 

रणजित नाईक निंबाळकर

हरिहर अॅग्रो

perni yantr

 मेसेज करा
 कॉल करा
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading