अतिवृष्टीमुळे कोणत्या जिल्ह्यात किती पीक नुकसान झाले? वाचा सविस्तर
24-09-2025

अतिवृष्टी पिकांचे नुकसान महाराष्ट्र - heavy rain crop damage Maharashtra
गेल्या दोन महिन्यांत झालेल्या जोरदार पावसामुळे आणि पुरामुळे राज्यातील तब्बल 26,78,000 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
ऑगस्टमध्ये नुकसान: 14,44,000 हेक्टर
सप्टेंबरमध्ये (23 तारखेपर्यंत) नुकसान: 12,34,000 हेक्टर
फक्त सप्टेंबर महिन्यातच 94 तालुके प्रभावित झाले असून, आतापर्यंत एकूण 195 तालुक्यांतील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
जिल्हानिहाय पिके नुकसान - district wise crop loss heavy rainfall
सर्वाधिक नुकसान धाराशिव जिल्ह्यात झाले आहे.
सप्टेंबरमध्ये: 1,81,200 हेक्टर
दोन महिन्यांत एकूण: 3,31,953 हेक्टर
या पावसामुळे शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. काही ठिकाणी जमीन वाहून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
कृषी विभाग पंचनामे करत आहे. त्यामुळे पुढील काळात नुकसानाचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मोसमी पाऊस शेतीचे नुकसान प्रभावित जिल्हे - monsoon crop loss Maharashtra 2025
राज्यातील 30 जिल्ह्यांतील शेती बाधित झाली आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार:
ऑगस्टमध्ये: 14,44,641 हेक्टर
सप्टेंबरमध्ये: 12,34,210 हेक्टर
अनेक जिल्ह्यांत पुरामुळे पिके वाहून गेली आहेत. सोयाबीनसारखी पिके काढणीला येत असतानाच नष्ट झाली.
सर्वाधिक नुकसान झालेली पिके
सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद.
सर्वाधिक नुकसान झालेले पाच जिल्हे
नांदेड, बीड, सोलापूर, यवतमाळ आणि वाशिम.
जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये) - खऱीप पिके नुकसान 2025
बुलढाणा - 58,754
अमरावती - 2,673
वाशिम - 38,541
यवतमाळ - 1,37,568
नागपूर - 2,016
चंद्रपूर - 1,486
वर्धा - 22,960
सोलापूर - 1,78,386
अहिल्यानगर - 1,68,775
पुणे - 273
जळगाव - 14,718
परभणी - 56,836
जालना - 93,818
बीड - 2,67,898
धाराशिव - 1,81,200
लातूर - 3,203
एकूण नुकसान: 12,34,201 हेक्टर