महाराष्ट्रात थंडीची लाट कायम

महाराष्ट्रात थंडीची लाट कायम
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Suraj Ghodke (null)

Published:

Maharashtra Weather Update: कोकणासह महाराष्ट्रात थंडीची लाट कायम, पावसाची शक्यता काय? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात थंडीची लाट कायम असून काही ठिकाणी थंडीच्या लाटेसारखी स्थिती निर्माण झाली आहे. निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी याबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे.

मध्य भारतातील हवामान स्थिती

मध्य भारतात समुद्रसपाटीपासून साधारण 1.5 किमी उंचीवर छत्तीसगडमधील भिलाई येथे चक्रीय थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. या थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील थंडी महाराष्ट्राकडे सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांत थंडीची लाट दिसून येत आहे.

थंडीची स्थिती: महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे तापमान

मंगळवारी सकाळी 8.30 वाजता निरीक्षण केलेल्या नोंदीनुसार, महाराष्ट्रातील काही प्रमुख ठिकाणांचे किमान तापमान खालीलप्रमाणे आहे. (कंसातील आकडे सरासरी तापमानातील घसरण दर्शवतात.)

 

  • अलिबाग: १३.७°C (-४.८)
  • रत्नागिरी: १५.३°C (-४.१)
  • डहाणू: १४.९°C (-३.६)
  • मुंबई (सांताक्रूझ): १५°C (-३)
  • अहिल्यानगर: ५.६°C (-४.५)
  • नाशिक: ८°C (-३.५)
  • पुणे: ८°C (-३)
  • सातारा: ९.१°C (-३.३)
  • नांदेड: ८.६°C (-४)
  • परभणी: ९.४°C (-३.२)
  • धाराशिव: १०.२°C (-३)
  • नागपूर: ८.२°C (-३.८)
  • वर्धा: ९.५°C (-३.३)

 

थंडी किती काळ टिकणार?

महाराष्ट्रात सध्या जाणवणारी थंडी बुधवार, १८ डिसेंबर (संकष्टी चतुर्थी) पर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गुरुवार, १९ डिसेंबर पासून पुढील १० दिवस राज्यात कमाल व किमान तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी नाताळ सणाच्या काळात दरवर्षीप्रमाणे तीव्र थंडी जाणवणार नाही.

वर्षाअखेरीस थंडी वाढणार?

वर्षाअखेरीस, म्हणजेच २९ डिसेंबर पासून तापमानात पुन्हा घट होऊन नववर्षाच्या स्वागताला महाराष्ट्रात थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

पावसाची शक्यता आहे का?

सध्या तरी महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नाही. परंतु वातावरणीय परिस्थितीत काही बदल झाल्यास नवीन अपडेट्स लवकरच दिले जातील.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा