अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा

29-07-2025

अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा
शेअर करा

अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा

फेब्रुवारी ते मे या काळात राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ३.९८ लाख शेतकऱ्यांचे १.८७ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.

 

या नुकसानीसाठी राज्य सरकारने ३३७ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.


पुणे जिल्ह्यातील परिस्थिती:

  • एप्रिल आणि मे महिन्यात १५,०३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

  • ४६,०२९ शेतकरी प्रभावित

  • सरकारकडून २५ कोटी ९६ लाख रुपये मंजूर


विभागानुसार नुकसान आणि मंजूर निधी:

विभागप्रभावित शेतकरीनुकसान क्षेत्र (हे.)मंजूर निधी (रुपये)
छत्रपती संभाजीनगर६७,४६२३४,५४२.४६५९ कोटी ९८ लाख
पुणे१,०७,०००४५,१२८.८८८१ कोटी २७ लाख
नाशिक१,०५,१४७४५,९३५.१६८५ कोटी ६७ लाख
कोकण१३,६०८४,४७३.६९९ कोटी ३८ लाख
अमरावती५४,७२९३६,१८९.८६६६ कोटी १९ लाख
नागपूर५०,१९४२०,७८३.१६४ कोटी ९१ लाख

सरकारचा निर्णय

राज्य सरकारने तातडीने निधी मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले की, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे.

अवकाळी पाऊस, सरकारी अनुदान, सरकारी योजना, relief-for-farmers-affected-by-unseasonal-rain

शेअर करा
Loading

संबंधित शेती विषयक माहिती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading