अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल!!! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल!!! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल!!! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर शेतजमीन पाण्यात बुडाल्या आहेत. यामुळे पिके, फळबागा नष्ट झाली, काही ठिकाणी जमीन खरपूस झाली, तर अनेक जनावरे आणि काही लोकांचा जीवही गेला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांनी बुधवारी नुकसान पाहण्यासाठी विविध जिल्ह्यांचा दौरा केला. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि आश्वासन दिले की, सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल.

मराठवाड्यातील ४८३ महसुली मंडळांपैकी ४५१ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. काही ठिकाणी दोन किंवा अधिक वेळा पाऊस पडल्याने शेतजमीन आणि पिकांना मोठा फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांनी सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करणे आणि कर्जमाफी यासारख्या मागण्या केल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "नुकसानी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल. मंत्रिमंडळाने पूरग्रस्तांसाठी २ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. टंचाई किंवा दुष्काळातील निकषाप्रमाणेच अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना मदत केली जाईल."

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील करंजा गावाची पाहणी केली. करळे वस्तीला पोहोचण्यासाठी त्यांना होडीने प्रवास करावा लागला, जे या परिस्थितीची गंभीरता दाखवते.