पशुपालकांसाठी मोठी खुशखबर! 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; राज्य सरकारची नवी योजना

पशुपालकांसाठी मोठी खुशखबर! 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; राज्य सरकारची नवी योजना
राज्यातील पशुपालकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.
काय आहे ही योजना?
राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ही योजना राबवली जात असून पशुपालकांना दैनंदिन खर्च, पशुखाद्य, औषधे आणि देखभालीसाठी खेळते भांडवल (Working Capital) उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश आहे.
कर्ज मर्यादा किती?
- किसान क्रेडिट कार्ड नसल्यास:
1.60 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज - दूध संस्थेची हमी असल्यास:
3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते - आधीच KCC असलेल्यांसाठी:
3 लाखांपर्यंत पतमर्यादा वाढवता येते
कोणाला मिळणार लाभ?
ही योजना खालील पशुपालकांसाठी उपयुक्त आहे:
- गायी/म्हशी पालन
- शेळी-मेंढी पालन
- कुक्कुटपालन
- वराहपालन
योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील 10 लाख पशुपालकांना लाभ देणे
- पशुपालन व्यवसायाला चालना देणे
- ग्रामीण भागात उत्पन्न वाढवणे
अधिक माहितीसाठी संपर्क
नजीकचे पशुवैद्यकीय दवाखाना किंवा हेल्पलाइन नंबर 1962 वर संपर्क साधावा.
कधीपासून लागू?
ही योजना 2026-27 पासून ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ अंतर्गत लागू होणार आहे.
महत्वाची सूचना
- कर्जाचा उपयोग पशुधनासाठीच करावा
- वेळेवर परतफेड केल्यास व्याजमाफीचा लाभ मिळेल
- आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवावीत