हवामान अंदाज: पावसाची गडगडाट सुरूच, कोणते जिल्हे धोक्यात…?
14-05-2025

हवामान अंदाज: पावसाची गडगडाट सुरूच, कोणते जिल्हे धोक्यात…?
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल जाणवत आहेत. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
येलो अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना?
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने 'येलो अलर्ट' जाहीर केला आहे.
- वाऱ्याचा वेग: ३० ते ४० किमी/तास
- शक्यता: विजांसह जोरदार पाऊस
ऑरेंज अलर्ट जाहीर असलेले जिल्हे
राज्यातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
- वाऱ्याचा वेग: ५० ते ६० किमी/तास
- अंदाज: विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, गारपिटीचा धोका
- प्रभाव: शेती पिकांवर प्रतिकूल परिणाम
शेतकऱ्यांसाठी विशेष इशारा
राज्यातील अनेक भागांत गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहावे. उभ्या पिकांचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
नाशिक, धुळे, जळगाव भागात काय?
या भागांत हलक्या पावसाची शक्यता असून वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.
परिणाम: तापमानात घट, वातावरणात गारवा
हे पण पहा:
पीक विमा : जर विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल तर काय कराल? जाणून घ्या सविस्तर
मान्सून लवकर येणार?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर दाखल होणार आहे.
- अंदमान-निकोबार बेटांवर लवकरच मोसमी वारे धडकतील
- केरळमध्ये मे अखेरीस मान्सून
- महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची तीव्रता वाढणार