कांदा लिलावात वाढले दर, बाजारात शेतकऱ्यांचा उत्साह..!

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

कांदा लिलावात वाढले दर, बाजारात शेतकऱ्यांचा उत्साह..!

कांदा लिलावात वाढले दर, बाजारात शेतकऱ्यांचा उत्साह..!

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारपासून (दि. १४) कांदा लिलाव सुरू झाले असून, पहिल्याच लिलावात कांद्याला प्रतिकिलो ४५ रुपये असा उच्चांकी दर मिळाला आहे. 

या यशस्वी सुरुवातीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यापुढेही चांगला दर मिळाल्यास नीरा बाजार समितीतील कांद्याची आवक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हळवी आणि आगाप कांद्याची विक्री सुरू

सध्या हळवी कांदा बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहे. हळव्या कांद्याची साठवणूक शक्य नसल्याने शेतकरी तो लवकरच विक्रीसाठी पाठवत आहेत. याशिवाय, आगाप लागवड केलेला गरवी कांदाही काढणीस तयार झाल्याने बाजारपेठेत कांद्याची आवक लक्षणीय वाढत आहे.

बाजार समितीचे तातडीचे निर्णय

शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीने तातडीने कांदा लिलाव सुरू केला आहे. यंदा जानेवारीत लिलाव सुरू झाला असून, मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात लिलावाला सुरुवात झाली होती. यंदा दर शनिवार कांदा लिलाव सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कांदा दर वाढीचा फायदा शेतकऱ्यांना

कांद्याला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. योग्य व्यवस्थापन आणि वाजवी दर कायम राहिल्यास नीरा बाजार समिती कांदा विक्रीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल.

ताजे कांदा बाजारभाव:

https://www.krushikranti.com/bajarbhav/kanda-bajar-bhav-today