पावसाची उघडीप संपली! १५ जुलैपासून राज्यात पुन्हा जोरदार पाऊस

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

पावसाची उघडीप संपली! १५ जुलैपासून राज्यात पुन्हा जोरदार पाऊस

पंजाब डख यांचा सुधारित हवामान अंदाज: पावसाची विश्रांती संपली, राज्यात पुन्हा पावसाचा जोर! 

गेले काही दिवस पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे आणि सोशल मीडियावरील '१० दिवसांच्या खंडाच्या' अफवा यामुळे शेतकरी बांधव चिंतेत होते. मात्र, हवामान तज्ञ पंजाब डख यांनी १४ जुलै २०२६ रोजी आपला नवीन अंदाज वर्तवून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

 

पावसाचा खंड संपला, अफवांवर विश्वास ठेवू नका!

  • सोशल मीडियावर १० दिवस पाऊस पडणार नाही, अशा अफवा पसरत आहेत, त्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये.

  • ८ जुलैपासून पावसाने घेतलेली विश्रांती आता संपली असून, आज (१४ जुलै) दुपारपासून आणि विशेषतः १५ जुलैपासून राज्याच्या बऱ्याच भागात पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे.

  •  

वंचित जिल्ह्यांना मोठा दिलासा (सोलापूर, लातूर, धाराशिव) ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्या शेतकऱ्यांसाठी पंजाब डख यांनी आनंदाची बातमी दिली आहे:

 

  • सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, बार्शी, कडा, आष्टी, बारामती, सांगोला आणि पंढरपूर या भागात १५ तारखेपासून पाऊस सुरू होईल.

  • १६ आणि १७ जुलैला या भागांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढेल आणि बऱ्याच क्षेत्राला पाऊस कव्हर करेल. पिकांना हे मोठे जीवदान ठरणार आहे.

  •  

१५ जुलै ते ५ ऑगस्ट: राज्यात सर्वदूर पाऊस

  • सुरुवात आणि वाढ: १५ जुलैला राज्याच्या बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होईल. १६ ला हा पाऊस वाढेल, १७ ला आणखी क्षेत्र व्यापेल आणि १८-१९ नंतर हा पाऊस असाच वाढत जाईल.

  •  

  • सलग पाऊस: १५ जुलैपासून सुरू होणारा हा पाऊस एकाच जागी न पडता, दररोज वेगवेगळ्या भागात पडत राहील आणि हा टप्पा ५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

  • इतर भागातील स्थिती: उद्यापासून पुणे, मुंबई, नाशिक, कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात होईल. तसेच उत्तर महाराष्ट्रात (नंदुरबार, धुळे) आणि संपूर्ण विदर्भात (नागपूर, वर्धा, चंद्रपूर ते अकोला, बुलढाणा) १५ तारखेनंतर पावसाची चांगली हजेरी राहील.

शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता, १५ तारखेपासून सुरू होणाऱ्या या पावसाच्या आगमनानुसार आपल्या शेतीचे नियोजन करावे.