एल निनोची भीती सोडा; २१ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुख्य पेरणीचा पाऊस!

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

एल निनोची भीती सोडा; २१ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुख्य पेरणीचा पाऊस!

नमस्कार मी पंजाब डख, आज आहे १५ जून २०२६. प्रसारमाध्यमांतून असं खूप ऐकायला भेटत आहे की यावेळेस एल निनोमुळे दुष्काळ पडणार आहे. तर सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आपण त्या एल निनो विषयी तसं सहमतच नाही आहोत. तर एल निनोमुळे दुष्काळ पडणार हे आपल्याला मान्य देखील नाहीये. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो, एल निनो असो वा नसो, आपल्या भारताला दोन समुद्र आहेत; एक अरबी समुद्र आणि दुसरा बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रातून जरी नाही पाऊस आला, तरी बंगालच्या खाडीमधून पाऊस येणार आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार. म्हणून मी म्हणतो, एल निनो असो वा नसो, आपल्या महाराष्ट्रात दरवर्षी पाऊस येणार हे निश्चित आहे.

आणि काय झालं, प्रसारमाध्यमांतून खूप ऐकायला भेटतंय की दुष्काळ पडणार आहे, पाऊसच पडणार नाही. पण शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो घाबरू नका. म्हणजे काय होणार आहे, या जूनच्या शेवटच्या आठवड्यात काय होणार आहे, एक पाऊस येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि याच्यातून जर काही शेतकरी राहिले, तर १० जुलै ते १५ जुलैमध्ये पुन्हा एकदा पाऊस येईल आणि त्याच्यात पेरण्या होणार आहेत. पण दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, म्हणून हा प्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा.

 

काय झालं, महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला; पण दाखल झाल्याच्यानंतर परत तो तिथेच स्थिरावला. पण ही जी परिस्थिती आहे, वारा सुटण्याची परिस्थिती, ही दरवर्षी कधी असते? पाऊस पडल्याच्यानंतर पुढच्या महिन्यात अशी परिस्थिती असते; पण यावर्षी काय झालं, ती सुरुवातीलाच आल्यामुळे शेतकऱ्याला असं वाटतंय की यावर्षी पाऊस पडणार नाही. आणि त्याच्यामधून काय झालं की प्रसारमाध्यमांतून बरंच भीतीचं वातावरण तयार केलं जातंय की दुष्काळ पडणार आहे. शेतकऱ्याला सर्वप्रथम सांगतो, यावर्षीचं वर्ष सगळ्यांत चांगलं राहणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांच्या हळूहळू पेरण्या सुरू होणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.

 

सर्वप्रथम मी म्हटलं होतं ना, एक ७ ते १४ चा एक टप्पा राहील, त्याच्यानंतर २१ ते ३० चा टप्पा राहील आणि नंतर १० जुलै ते १५ जुलैचा टप्पा राहील; ही अशीच परिस्थिती राहणार आहे. यावर्षी जून महिन्यात थोडाफार पाऊस कमी राहणार आहे, जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टला कमी राहील आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मात्र परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. पण दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. तर तुम्हाला सांगतो, यावर्षी शेतकरी हिताचाच काळ आहे, शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं आहे, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.

आता हे म्हणजे काय होणार आहे, पाऊस कसा येणार आहे? पावसाला सुरुवात काय होणार आहे, १८ जूनच्या नंतर विदर्भाकडून बऱ्याच ठिकाणांवरून, पूर्व विदर्भाकडून सुरुवात होणार आहे. १८-१९ च्या दरम्यान पूर्व विदर्भाकडून तो पाऊस मराठवाड्यापर्यंत येईल. त्याच्यानंतर काय होईल, २०-२१ च्या नंतर मराठवाड्याकडे पाऊस आल्याच्यानंतर, २१ ते २९ च्या दरम्यान मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल आणि जिथं जास्त ओल होईल तिथे शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होतील. विदर्भात देखील काय होईल, १८-१९ पासूनच तिकडे पावसाला सुरुवात होईल; जिथं पाऊस जास्त पडला, त्यांच्याकडे ओल झाली की त्यांच्या देखील पेरण्या होतील.

त्याच्यानंतर हा पाऊस पुन्हा उत्तर महाराष्ट्राकडे जाईल. मग उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल? म्हणजे विदर्भापासून उत्तर महाराष्ट्र, हे सगळ्यात टोक... हे एक टोक ते दुसरं टोक आहे. मग तिकडे काय होईल, २३ जून ते २९ जूनच्या दरम्यान तिकडे देखील पाऊस जाईल आणि त्यांच्या देखील पेरण्या लागतील. पण शेतकऱ्याला सांगतो, पश्चिम महाराष्ट्र... सातारा, सांगली, सोलापूर त्या पट्ट्यामध्ये काय होईल? तिकडे देखील २३ जून ते २९ जूनच्या दरम्यान तिकडे देखील पाऊस पडेल आणि तिकडे देखील पेरण्या होतील. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, तुम्ही मनातली भीती बाळगू नका; कारण बऱ्याचदा तुम्हाला मोबाईल उघडला की दुष्काळ आणि ते एल निनोच दिसायला लागलं आहे.

 

शेतकऱ्यांनो, हे दरवर्षी काय असतं? हे जे असं वारा आहे ना, कधी कधी पाऊस पडल्याच्यानंतर असं असतं; १० दिवस इतका वारा येतच असतं. तर तुम्हाला सांगू इच्छितो, १९ तारखेच्या नंतर, १९ जूनच्या नंतर राज्यामध्ये हा उन्हाचा पारा देखील कमी होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. २० तारखेपासून उन्हाची तीव्रता कमी होईल, ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. पण राज्यात मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पेरणीयोग्य पाऊस होईल, वेगवेगळ्या भागात पडेल. पण शेतकऱ्याला वाटतंय की सगळीकडे पहिल्याच दिवशी येणार; तर सगळीकडे नाही पडणार, काय होणार दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल आणि दाखल होईल, म्हणून हे लक्षात घ्यायचं. मान्सूनचा पाऊस सगळीकडे एकदाच जात नसतो, दररोज काय होतं वेगवेगळ्या भागात दाखल होतो; जिथं जास्त ओल होते, तिथल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होतात, म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं.

 

शेतकऱ्याला सांगू इच्छितो की २१ जून ते ३० जून दरम्यान ज्या ज्या भागात पाऊस पडेल, तिथं चांगला पडेल तिथे देखील पेरण्या होतील. आणि दरवर्षी शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, मी पहिल्यापासूनच म्हणालो होतो की २०२६ ला थोडाफार पाऊस कमी होईल, पण परतीचा पाऊस जास्त होणार. म्हणजे काय होतं, दर दोन वर्षांच्या नंतर एक वर्ष पाऊस कमी होणार आहे, हे म्हणून लक्षात घ्यायचं. आता या २०२६ ला कमी होईल, तर २७-२८ ला परत खूप होईल; आणि पुन्हा २०२९ ला, आज जशी परिस्थिती झाली तशी २९ ला देखील परत परिस्थिती होईल. म्हणजे दोन वर्ष जास्त पाऊस पडणार आणि एक वर्ष कमी होणार, हे असं चक्र चालू राहणार. पण काय झालं की प्रसारमाध्यमांतून शेतकऱ्याला त्या एल निनोविषयी खूप भीती घातली गेली आहे.

 

तर तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनो, हे पण नंतर या सगळ्या बातम्या बदलणार आहेत बघा तुम्ही; पाऊस सुरू झाल्याच्यानंतर सगळ्या बातम्या बदलतील. म्हणून माणसाने, माझं म्हणणं आहे की एक तर ठामच राहिलं पाहिजे, एक तर येणार का नाही येणार. मग ते म्हणतात की एल निनोमुळे म्हणतात की एक तर दुष्काळ पडेल, नाहीतर अतिवृष्टी होणार म्हणतात. तुम्हाला एल निनो आहे ना, तर एकच कोणतं तरी सांगा, एक तर दुष्काळ पडेल का पाऊस पडेल? पण शेतकऱ्यांना सांगतो, हे सगळे प्रसारमाध्यमांतून शेतकऱ्यांना भीती घालतात, शेतकऱ्यांनो घाबरून जाऊ नका; पाऊस पावसाचं काम करीतच असतो.

 

सर्वप्रथम आपला भारत देश आहे; भारत देशाला दोन समुद्र आहेत, अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र. म्हणून जरी अरबी समुद्राच्या त्या बाष्पाचा पाऊस नाही आला, तरी बंगालच्या खाडीचा पाऊस येतो; आणि ज्या ज्या वर्षी मान्सून काय होतो, आल्याच्यानंतर स्थिरावतो, थांबतो, आणि त्याच्यानंतर काय होतो मग पाऊस पूर्वेकडून येतो. आणि पूर्वेकडून आल्याच्यानंतर काय होतं, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा असा करीत पाऊस मग उत्तर महाराष्ट्राकडे जातो आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या लागतात, म्हणून हे लक्षात घ्यायचं. एल निनो वगैरे काही नाही, शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार आहेत हे निश्चित, काळ्या दगडावरची रेघ आहे; म्हणून काही शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाही.

 

शेतकऱ्याला परत एकदा सांगतो, जमिनीची, शेताची पेरणी करीत असताना चांगली अशी इतभर ओल गेल्याच्यानंतर पेरणीचा निर्णय घ्या, कारण की इतभर ओल गेल्याच्यानंतर तुम्ही कधीही पेरू शकता. हे पाहू शकता, सगळं रेडी करून ठेवलंय; बियाणं आणून ठेवलंय, खत आणून ठेवलंय, फक्त पाऊस पडल्याच्यानंतर जशी शेतात ओल येईल, इतभर ओल गेली की मग आम्ही देखील पेरणीचा निर्णय घेणार आहोत.

 

त्या इतभर ओलीचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो; इतभर ओल गेली, पेरल्याच्यानंतर काय होतं जमिनीमध्ये मूळ जाते, तर काय होतं जरी १५ दिवस जरी पाऊस नाही आला तरी ते पीक काय होतं, त्या इतभर ओलीवर टिकून राहतं. पण शेतकऱ्याने चार बोट, सहा बोट ओलीवर जर पेरणी केली, त्याची मूळ लगेच खाली खंटीला जाते, कोरड्यात जाते, मग ते पीक सुकतं; म्हणून शेतकऱ्याला सांगतो, चांगली जमिनीमध्ये ओल गेल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये.

 

परत एक सांगतो, दुष्काळाचे संकट कसे असते? संपूर्ण आपला हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये कुठे, कोणत्या ठिकाणी पावसाचा एक थेंब देखील पडत नाही, त्यावेळेस अशी चव (दुष्काळ) असते. पण तुम्हाला सांगतो, या दोन-तीन दिवसांपासून, काल देखील इकडे विदर्भामध्ये... बुलढाणा इकडे घाटाच्या खाली बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला; त्या घाटाच्या जामूद नदीला देखील काल पूर आला. म्हणजे पाऊस येणार आहे, म्हणून शेतकऱ्यांनी घाबरू नये; आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, पेरण्या होणार आहेत. फक्त पेरण्या काय होणार आहेत, आता हे मान्सून एकदा आल्याच्यानंतर थोडा विस्कळीत झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने पेरण्या होतील; जिथं पाऊस पडला ते शेतकरी पेरतील, जिथं कमी ओल आहे त्यांच्या पेरण्या राहतील. पण सगळीकडे काय होईल, दोन टप्प्यांमध्ये आणखीन... म्हणजे २१ ते ३० मध्ये आणि १० जुलै ते १५ जुलैमध्ये पाऊस पडेल आणि त्यांच्यामध्ये देखील त्या पेरण्या होऊन जातील, म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाही. धन्यवाद.