पिकांच्या फवारणीसाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी..?

16-08-2024

पिकांच्या फवारणीसाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी..?

पिकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?


गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे आंतरमशागतींच्या कामाला ब्रेक लागला होता. पण, आता अनेक भागांत उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, वातावरण बदलाचा पिकांवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे कीडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

त्यामुळे आता कृषी विभागाकडून फवारणी डब्ब्यासंदर्भात जनजागृती अभियान राबविणे गरजेचे आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून विविध कीटकनाशकांची फवारणी करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, फवारणी करताना शेतकरी, मजुरांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

कीटकनाशकांचा अतिविषारी, विषारी, बिनविषारी या तीन प्रकारात समावेश होतो. यामधील लाल स्टिकर असलेला डब्बा विषारी असून, फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक वापरणे  आवश्यक आहे.

जनावरांना होऊ शकतो धोका

फवारणी करताना किटकनाशक तोंडात जाऊ नये यासाठी तोंडाला कपड्याने बांधावे.
किटकनाशकाचे मिश्रण हाताने (मिक्स) ढवळू नये.
ज्या भागात फवारणी केली आहे, त्या भागात किमान आठ दिवस जनावरे सोडू नयेत.
उपाशीपोटी फवारणी न करता न्याहारी करून करावी.
 

कशी काळजी घ्यावी?

कीटकनाशक औषध हाताला किवा शरीराच्या इतर भागाला लागणार नाही याची काटकसरेने दखल घ्यावी ते तोंडात गेले तर तत्काळ जवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लाल स्टिकरचा डब्बा सर्वाधिक विषारी

फवारणी करताना विषबाधा झाल्यास घरगुती उपचार न करता तत्काळ रुग्णालयात दाखल करावे जेणेकरून वेळेस उपचार मिळतील. 
लाल चिन्ह असलेला डब्बा सर्वाधिक विषारीअसतो, विषारी आणि कमी विषारी असे तीन प्रकार कीटकनाशकात आहेत.
यामध्ये लाल स्टीकर असलेला डब्बा जास्त विषारी असतो हे कीटकनाशक अत्यंत काळजीपूर्वक वापरावे लागते.
 

सापांचाही वावर वाढला

पावसाचे पाणी जमिनीत घुसून शेतशिवारात सरपटणाऱ्या या प्राण्यांची बिळे बंद होत आहेत. बिळे बंद झाल्यामुळे साप हे धुरे-बांधावरील गवतात, शेतातील पिकात लपत असतात. सोयाबीनच्या पिकांमध्ये सापांचा वावर जास्त वाढलेला आढळतो.

त्यामुळे पिकामध्ये खुरपणी, फवारणी करताना शेतकरी, शेतमजुरांनी काळजी घेणे आवश्यक आहे. नजर चुकीने सापावर पाय पडला, हात लागल्यावर सापाने दंशानंतर तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे.

पिकात खाली वाकू नये, साप दिसताच त्याला न डिवचता सर्पमित्राला संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

फवारणी सुरक्षा, कीड नियंत्रण, वातावरण बदल, विषारी कीटकनाशक, शेतकरी काळजी, जनजागृती अभियान, सापांचा वावर, शेतकरी सुरक्षा, आंतरमशागत काम, पिकांची काळजी, shetkari, fawarni kalji, kalji, शेतकरी

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading