महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार? 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट…
24-06-2025

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार? 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट…
राज्यात हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा
कोकणात उंच लाटा, बोटींना समुद्रात जाण्यास मनाई:
राज्य सरकारने कोकणातील किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना पुढील काही दिवस अत्यंत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
INCOIS (भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र) यांच्या अंदाजानुसार, २४ जून संध्याकाळी ५.३० वाजल्यापासून ते २५ जून रात्री ८.३० पर्यंत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लहान नौका आणि बोटी समुद्रात न नेण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
राज्यातील काही जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'
हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. याचा अर्थ या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसामुळे घडलेल्या घटना:
राज्यात पावसामुळे काही दुर्घटना घडल्या असून जीवितहानीसुद्धा झाली आहे:
- ठाण्यात एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेला.
- दुसऱ्या घटनेत, खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू झाला.
- पुण्यात नदीच्या प्रवाहात एक व्यक्ती वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या २४ तासांचा पावसाचा आढावा:
राज्यातील पावसाची नोंद (मिमी मध्ये) खालीलप्रमाणे आहे:
- पालघर – ७३.३ (सर्वाधिक)
- सिंधुदुर्ग – ३६.४
- रत्नागिरी – २५.८
- ठाणे – १४.३
- कोल्हापूर – १३.९
- रायगड – १०.७
- नाशिक – ६.२
- गडचिरोली – ६.७
- पुणे – ४.३
- सातारा – ४.७
- अकोला – ३.४
- गोंदिया – १.७
- नागपूर – १.५
(बाकीचे जिल्हे: ०.१ ते २.९ मिमी दरम्यान)
विदर्भातही पावसाचा जोर वाढणार!
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २४ जूनपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अकोला, नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, आणि बुलढाणा जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. रविवारीच या भागांमध्ये हवामानात गारवा जाणवला आणि तापमानात लक्षणीय घट झाली.